चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे ही फार आनंदाची गोष्ट नाही   

डब्ल्यूईएफचे एमडी क्लॉड स्मदजा यांचे मत

नवी दिल्ली : भारत जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पण यात कोणताही असे मोठा आनंदाचा भाग नाही.  कारण दरडोई विकासदराच्या (जीडीपी) बाबतीत भारत जपानपेक्षा खूप मागे आहे, असे मत जागतिक आर्थिक मंचाचे (डब्ल्यूईएफ) माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) क्लॉड स्मदजा यांनी व्यक्त केले.एप्रिल २०२५ च्या आयएमएफच्या आकडेवारीनुसार, भारताचा दरडोई विकासदर दोन हजार ८७८.४ आहे. जो जपानच्या दरडोई विकासदराच्या ३३ हजार ९५५.७ च्या सुमारे ८.५ टक्के आहे. याचा अर्थ असा, की जपानचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा सुमारे ११.८ पट जास्त आहे.

काय आहे तपशील?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्मदजा म्हणाले, दरडोई उत्पादनाच्या बाबतीत, भारत जपानपेक्षा खूपच खाली आहे. जागतिक आर्थिक संतुलनात भारताने चौथे स्थान मिळवले आहे, हे प्रगतीचे एक चांगले सूचक आहे, परंतु यामुळे कोणत्याही प्रकारचा आनंद व्यक्त करण्याचे कारण नाही. याउलट, भारताची नवीन आर्थिक परिस्थिती सुधारणांना गती देण्यासाठी आणि विकासाचा परिणाम केवळ शहरी आणि ग्रामीण केंद्रांमधील उदयोन्मुख मध्यमवर्गासाठीच नव्हे तर सर्व नागरिकांसाठी कसा होईल यासाठी काम करणे गरजेचे आहे. जागतिक तंत्रज्ञानाच्या शर्यतीत भारत एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. मोठ्या डेटामध्ये त्याची अद्वितीय धार आहे. ही एक अशी संपत्ती आहे जी देशाने जपली पाहिजे. जागतिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून देशाला आघाडीवर नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. चीन, युरोप आणि अमेरिकेसह भारत हा जगातील सर्वात मोठा डेटा उत्पन्न करणार्‍या देशांपैकी एक आहे.
 

Related Articles